खादाडी पुण्यातली ९० च्या वेळेची (भाग २ )
क्रमशः
तसा पेरूगेट भावेस्कूल समोर अजूनही असलेल्या ‘लक्ष्मी विश्रांती गृह’मध्ये बटाटे वडा सुरेख मिळायचा.सणसणीत आकारचा कायम गरम मिळणारा वडा,त्याबरोबर भरपूर मिरची आणि लसूण घालून ताजी केलेली भुकटी सारखी चटणी.१९९० पर्यंत हा आत्ताच्या भाषेत ‘जंबो वडा’ एक वडा केवळ १ रुपयात मिळायचा.पुढे पेरूगेट चौकात असलेलं मानकर ह्याचं आताचे ‘गोपी नॉनव्हेज’ तेव्हा ‘प्युअर व्हेज’ होतं.तिथे मिळणार्या वडासँपल,आणि मिसळीकरता आसपासची कॉलेजची आणि नोकरदार दुनिया एकवटायची.रेट माफक असल्याने विशेषतःपेरूगेट भावेस्कूलचे आणि ज्युनिअर कॉलेजचे कुमार लेक्चर ‘बंक मारून’ इकडेच सापडायचे.नंतर समोर अमृततुल्य मधला चहा हमखास.
स.प.समोरचं ‘उदयविहार’ स.प.एवढेच धो धो चालायचे(नंतरनंतर त्याच्या बेसमेंट मध्ये कॅरम खेळणाऱ्या “खेळींच्या” रांगा जास्ती लागायच्या) त्याच्या शेजारीच असलेल्या छोटेखानी ‘लवाटे snacks चा त्यावेळेच्या सदाशिव पेठेत ब्रेडआम्लेट आवडणार्यांना आधार होता.नाहीतर स.प.पोस्टाच्या बाहेर बोळात,ठराविक दिवशी, विशिष्ट पदार्थ मिळणारी टपरी(नाव पुन्हा विसरलो) त्याच्याकडे पायनापल शिरा,मिसळ,सगळेच पदार्थ खास.
आताच्या ग्राहक पेठेच्या जागेत पूर्वी असलेले ‘जीवन’तोपर्यंत काळाच्या पडद्याआड गेलं होतं.आणि टिळक स्मारकच्या अगदी चौकात असलेलं ‘मुक्ता’ कॉलेजियन्स मध्ये फार कमी काळात‘ हिट’ झालं होतं.टि.स्मा.चौकात असलेल्या बादशाही (पूना रिफ्रेशमेंट ) मधले उपवासाची कचोरी,कोथिंबीरवडी सारखे खास महाराष्ट्रीय पदार्थ खायला बाहेगावातून नोकरी निमित्त आलेले नोकरदार लोक आवर्जून यायचे(अजूनही जातात) आताच्या एस.पी.ज बिर्याणी च्या जागी त्याच नावानी व्हेज हॉटेल सुरुवातीला काही वर्ष होतं. तिथे वरती असलेल्या family रूम मध्ये ग्रुपमधल्या पोरींना नेवून पार्टी देणे म्हणजे स.प मधल्या मुलांना एकदम प्रेस्टीज असायचं.
रमणबाग चौकात अगदी ५-६ वर्षापूर्वीपर्यंत सुरु असलेलं ‘किस्मत’ हे पण जळजळीत मिसळीकरता तिखट खाणाऱ्या जमातीमध्ये मापदंड म्हणून प्रसिद्ध होतं.पलीकडे केसरी वाड्याच्या समोरच असलेलं ‘प्रभा’ तेव्हा त्यांच्याकडे मिळणार्या पातळ रस्सा,ब्रेड ,चटणी आतच घालून केलेल्या बटाटा वड्याकरता,आणि उपासाच्या कचोरी करता एकदम पुरातन काळापासून फेमस.आता तेवढी कचोरी बनवणं त्यांनी बंद केलं. बाकी चव अगदी तशीच.प्रभाच्या समोरच महिला बचत गटाने चालवलेले ‘सुगरण’ म्हणजे नाश्त्याच्या पदार्थांपासून ते पोळीभाजीपर्यंत सगळे पदार्थ पुरवणारं हमखास ठिकाण.तिथून थोडसंच पुढे रमणबाग चौकाकडे जाताना छोटेखानी ‘अरविंद कोल्ड्रिंक हाउस’ तिखट रस्सापाव ह्याकरता दर्दी खवय्ये मंडळीत फेमस होतं.नूमवी शाळेच्या शेजारी संतोष भुवन मध्ये
शनिवार पेठेत अहिल्यादेवी हायस्कूल समोरच्या ‘रामदास’मध्ये रस्सा आणि स्लाईस खायला शनिवार पेठेतल्या सगळ्या शाळेत मुलांना सोडायला येणाऱ्या तमाम रिक्षावाल्या काकांची नेहमीच गर्दी असायची.
कुमठेकर रस्त्यावरचं ‘स्वीटहोम’ म्हणजे सहकुटुंब जाण्याचे प्रमुख ठिकाण होतं.’स्वीटहोम’मधल्या साबुदाणा खिचडीवर भरपूर कोथिंबीरीची पेरणी असायची.तिथली इडली विशेषतः सांबार आणि त्याच्यावर बारीक शेव घालून, म्हणजे तर अगदी इडलीची खास पुणेरी चव. तिथेही सगळे नाश्त्याचे पदार्थ उत्तम मिळायचे.कुमठेकर रस्त्यावर जोंधळे चौकातल उडपीच्या आण्णाचे ‘गणेश’ तेव्हा बहुतेक नुकतच सुरु झालं होतं.त्याच्याकडे मात्र टिपिकल उडपी चवीचे इडली सांबार त्यावरती मुबलक खोबरं घातलेली ओली चटणी घालून मिळायचं.नाहीतर झटपट मिळणारा डोसा,उत्तप्पा खावून नोकरदार पटकन आपली दुचाकी बाजूला लावून खावून घ्यायचे.पण त्याच्या पेक्षा जास्ती गर्दी पलीकडच्या ‘प्रभाकर बेकरी’ मधले पट्टी सामोसे घ्यायला व्हायची.लोकं हे सामोसे घ्यायला त्यावेळी रांगा लावून थांबायचे.कुमठेकर रस्त्यावरच ट्रेनिंग कॉलेजच्या थोडं पुढे काही वर्ष ‘पेशवाई’ नावाचे हॉटेल काही वर्षे होतं,ते पण झकास चालायचं.
जिमखान्यावर राहणारे लोक डेक्कनवर अप्पाकडे सोमवार ,गुरुवार ,शनिवार काकडी ,खिचडीकरता गर्दी करायचे (आणि इतर वारी त्याच्याकडच्या बटाटेवड्याकरता)आणि गावात राहणारे खवैये लक्ष्मी रस्त्यावरच्या जनसेवा मध्ये.सोमवार ,गुरुवार,शनिवार,चतुर्थी आणि मोठ्या एकादश्या सोडून पुण्यात कोणी साबुदाणा खिचडी खात नाही असा त्यावेळी पुण्यातल्या हॉटेलवाल्यांचा सार्वत्रिक समज होता.
तुळशीबाग म्हणजे समस्त महिलावर्गाचे लाडके ठिकाण,पण ज्युनियर कॉलेजच्या दिवसात आमच्यासारख्या खादाडांसाठी तुळशीबागेची बाजीराव रस्त्याची सुरवात म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र पासून लक्ष्मी रस्त्याच्या तोंडाशी असणार्या काकाकुवा मँन्शन पर्यंत खाण्याची रेलचेल असायची.सकाळी घरगुती चवीची साबुदाणा खिचडी,उपीट,पोहे,बटाटे वडे हमखास मिळायचे ठिकाण म्हणजे हा परिसर.काकाकुवा मँन्शनच्या आत गेल्यावर समोरच एक छोटेसं हॉटेल होतं(नाव आता आठवत नाही)पण नाश्त्याचे सगळेच पदार्थ दुपारपर्यंत छान मिळायचे.
पण त्याहीपेक्षा दरवाज्याच्या बाहेर एक काका बरेच वर्ष सकाळी ७ च्या सुमारास सायकलवरून घरून डबे भरून शिरा,पोहे,उपीट,साबुदाण्याची खिचडी (खिचडीचे वार तेच तत्कालीन पुण्यातले.. सोमवार,गुरुवार,शनिवार)असे घेऊन यायचे.सकाळी लवकर ऑफिसला जाणारे नोकरदार,रस्त्यावर साफसफाई करणारे कामगार इथपासून मंडई परिसरात ‘रूमवर’राहणारे असंख्य कॉलेजकुमार असे सगळेजण ते येण्याची चातकासारखी वाट बघत असायचे.ते दिसले कि त्यांच्या सायकलभोवती गराडा पडायचा.पेपरप्लेट मध्ये एकेक वाटी भरून फटाफट सगळ्या गर्दीची क्षुधाशांती व्हायची.मग हळूहळू अश्या डबे भरून नाश्त्याची सोय करणाऱ्यांची त्या परिसरात गर्दी व्हायला लागली.आणि ते लोण मग सगळ्या पुण्यातच पोचले.आता शहरातल्या सगळ्या प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळात असे नाश्ता घेऊन उभे असलेले डबेवाले दिसतात.
त्याच्यावरून अजून एक आठवण झाली.त्याकाळी आजच्यासारखे नाश्त्याचे स्वस्तात मिळणारे पदार्थ रात्री उशिरा मिळायचे नाहीत.विशेषतः कॉलेज मधल्या परीक्षेकरता ‘नाईट मारणाऱ्या’ विशेषतः होस्टेलमध्ये रहाणार्या मुलांना जर रात्री उशिरा,पहाटे जर भूक लागली(आणि ति हटकून लागायचीच)तर सरसकट स्वारगेट ,शिवाजीनगर एस.टी.Stand वर जाण्याचा प्रघात होता.खिशात उरलेल्या कमी पैशात खाण्याची त्याच्यापेक्षा आद्य ठिकाणे म्हणजे ‘मंडईमधले ‘मार्केट उपहार गृह’ आणि रात्रभर व्यवसाय करायचं ‘लायसन’ असलेलं लक्ष्मी रस्त्यावरचे गोखले हॉलच्या समोरचे ‘अंबादास धाकू निकम’ ह्यांचे “अंबादास”.रात्री साधारण दीड-अडीच च्या सुमारास ह्या ठिकाणी जरा ‘एक्ष्ट्रा’ तर्र्री मारून खाल्लेल्या ‘जाळ’ मिसळ किंवा ‘सॅंपलपाव’ खाण्यातली अविस्मरणीय ‘गोडी’ फक्त “अभ्यासाकरता(किंवा त्यापेक्षाही अभ्यासाच्या नावाखाली) जागरण केलेल्या “त्यावेळेच्या पोरांनाच” समजेल.पैकी ‘मार्केट उपहार गृहात खाण्याच्या व्यतिरिक्त माणसांचे जे अपरात्री दिसू शकतात ते सारे ‘रंग’ दिसू शकायचे.तिथे पलीकडच्या अनोळखी माणसाशी त्याच्या आधी सुरु असलेल्या चर्चेत बिनदिक्कतपणे भाग घेण्याचा खास पुणेरी अधिकार फक्त एखादा चहाचा कप घेऊन मिळायचा.कधी गिर्हाईकांची चर्चा चांगली सुरु आहे असे दिसले तर दुकानात कॅशला बसलेले शेठ उत्सुकतेने स्वतः येवून त्यात तेवढ्याच पुणेरी अधिकारवाणीने उतरायचे.रात्री नाटक,गाण्याचे प्रयोग संपवून बरेच कलाकार,बडी नेते मंडळी आवर्जून ‘मार्केट’चा कानोसा घ्यायला आवर्जून हजेरी लावायची.
आणि ह्याउलट चित्र ‘अंबादास’ मध्ये.या,काही शिल्लक असले तर खा ,चहा प्या,पैसे द्या आणि निघा.पण सदाशिव पेठ आणि नारायण पेठेच्या मधोमध राहून, काहीशा अबोल झालेल्या ‘अंबादास धाकू निकम’ ह्यांच्याशी जर एकदा सलगी झाली तर त्या माणसासाठी वडासँपल,मिसळ खास राखून ठेवले जायचे.तर्री स्वतः अंबादासशेठनी येवून वाढली तर समजायचे तुम्ही त्यांच्या अगदीच खास गोटातले.दिवसभर ( १ ते ४ सोडून ) जी गर्दी शेजारच्या ‘उपाध्ये ह्यांचे जनसेवा दुग्धालय’इथे असायची तेवढी कदाचित थोडी जास्तीच रात्री ‘अंबादास’च्या आतबाहेर असायची.ह्याच्यावरून त्यांची महती पुण्यात नवीन असलेल्यांना लक्षात येईल.आता शेजारचे खिचडीसाठी रात्रभर साबुदाणे भिजवत ठेवणारे ‘जनसेवा’पण नाही ,आणि अंबादास धाकू निकम’ ह्यांचे ‘अंबादास’ पण नाही.
फर्ग्युसन,बी.एम.,Modern हॉस्टेल मधली दर्दी चहाबाज मुलं रात्री उशिरा शिवाजीनगर च्या न.ता.वाडी.च्या डेपो शेजारी असलेल्या ‘चाचा’च्या टपरीवर ‘चहा मारायला’चक्कर मारायची.फर्ग्युसन मधल्या मुलांना आसपास वैशाली,रुपाली तर कायमच होतंच.पण गेट समोरचं असलेलं ‘सवेरा’ आणि तुकाराम पादुका चौकाच्या पुढे असलेलं पै ह्यांचे ‘निरंजन’ म्हणजे तर कॉलेजमधल्या मुलांची हक्काची मेस.तिथे एकंदर उडपी पद्धतीचे बाकी पदार्थ पण चांगले मिळायचे.
८० च्या दशकात ८० फुटी झालेल्या शास्त्री रस्त्यावर,लोकमान्यनगर मधलं अभ्यंकरांच ‘अजंठा’ मधे किंचित तिखट चवीचे तर्रीवाले सांबार आणि इडली,मिसळपाव,सामोसे ,वडे,भजी असे माफक ऑप्शन असणारे पण त्याच्यामुळे त्यावेळी लोकमान्य नगर भागात कॉटबेसिस वर राहणाऱ्या कॉलेजमधल्या मुलांचं आणि नोकरदारांच नाश्ता करायचं हमखास ठिकाण होतं.
सिंहगड रोड वरच्या लोकांना हॉटेलमध्ये खायला विठ्ठलवाडी देवळाच्या कमानीच्या शेजारी असलेल्या हॉटेल ‘श्री.विठ्ठल’ मध्ये, नाहीतर थोडं चविष्ट खायचं असेल तर फक्त हिंगण्यातल्या ‘आनंद’चाच आधार होता.तिथल्या पुणेरी दही मिसळीचा आस्वाद घ्यायला मात्र दर्दी लोकं आवर्जून अगदी पुण्यातून यायची. त्यावेळेच्या हडपसर,बाणेर ह्या उपनगरात लहानसहान टपरीवर उकळ्या चहा आणि शेवचिवडा,फराळ करणाऱ्या लोकांसाठी धूळ बसलेल्या काचेच्या बरण्यात भरून ठेवलेले शेंगदाण्याचे लाडू असायचे.लहान मुलांकरता रावळगाव सारखी चॉकलेट भरून ठेवलेली असायची.त्यावेळेच्या काही टपर्या आता ‘परमिट रूम’ झाल्या आहेत.
सामिष खाणार्यांना मंडई मधले ‘दुर्गा’,शिवाजी रस्त्यावरचे ‘आसरा’ नाहीतर चित्रशाळा चौकाच्या जवळचे ‘आशीर्वाद’ इथेच जायला लागायचे(त्याच रस्त्यावर आता जवळपास १५-२० मांसाहारी हॉटेल्स आहेत)नाहीतर एकदम मॉडर्न कॅफेवाल्यांचे ‘बांबू हाउस’.मत्स्याहारी लोकांना बालगंधर्व चौकातले ‘कलकत्ता बोर्डिंग हाऊस नाहीतर डेक्कनवर पूनम हॉटेलच्या शेजारी असलेले ‘गोमंतक’ स्वस्तात मस्त.मासे खायची एकदम घरगुती सोय.
१९९०-९१ नंतर आमचं पुण खरोखरच खूप बदललं.चहूबाजूला विस्तारलं.उपनगरं तर कधी शहरात आली ते समजलंच नाही.त्याच्या बरोबर पुण्याने सामावून घेतली नव्याने आलेली लाखो माणसं.त्यांच्या खाद्यसंस्कृती.
त्याकाळी फक्त किर्लोस्करांच्या ‘ब्ल्यू डायमंड’मध्ये किंवा ‘कॅम्प’मधल्या मोजक्या ठिकाणी मिळणारे कॉंटीनेन्टल पदार्थ पुण्यात बहुदा फक्त प्रभात रस्त्याच्या सुरुवातीला असणार्या ‘दर्शन’मध्येच मिळायचे.अगदी स्टार हॉटेलच्या दर्जाचे,अजूनही मिळतात.पण आता जगातल्या प्रत्येक पद्धतीच्या खाण्याचे पदार्थ पुण्यात मिळतात,आणि पुणेकर ते खाण्याकरता आवर्जून त्या ‘थीम हॉटेल्सना’ भेटी देत असतात.चांगले असतील तर(च) त्यांचे कौतुक करतात.
चायनीज पदार्थांना आपल्याकडच्या हॉटेल्समध्ये कधीच मेनूकार्डवर पंजाबी पदार्थांच्या बरोबर मानाचे पान मिळालंय,पण त्याबरोबरच इटालिअन ,जपानीज,थाई,मन्गोलिअन,मेक्सिकन सगळ्या पद्धतीच्या हॉटेल्सची पुण्यात रेलचेल झाल्ये.
पण अस्सल खवैय्या पुणेकर मालवणी पद्धतीचे जेवण,कोल्हापुरी तांबडा,पांढरा रस्सा,बीडच्या पद्धतीची बिर्याणी, लोणी धपाटे हे सगळेच पदार्थ चवीने खातो.नागपुरी सावजी मटणापासून ,जळगावच्या भरीत भाकरी पर्यंत पुणेकरांना कुठलाही पदार्थ वर्ज्य नाहीये. दावणगिरी डोसा, नीर डोसा,इडीअप्पम,कोरी रोटी ते मॅकसिकन नॅकॊज,टॅकोजपर्यंत सगळ्याच पद्धतीच्या खाण्यावर तो तेवढ्याच प्रेमाने तुटून पडतो.खाण्यामध्ये पुणेकरांना कुठलीही जिल्ह्याची,राज्याची,देशाची हद्द पसंत नाही.
पूर्वी लक्ष्मी रस्त्यावरच्या हिंदुस्तान बेकरीचे,शनिपाराच्या शेजारच्या ग्रीनचे, आपटे रस्त्यावरच्या संतोष बेकरीचे ,जोगेश्वरीच्या समोरच्या बोळातल्या पुना बेकरीचे ‘पॅटीस’घ्यायला रविवारी गर्दी व्हायची.आता पॅटीस ऐवजी नव्याने उघडलेल्या अनेक 'कन्फेक्शनरीज' मध्ये ‘व्हेज पफ’ खायला आजची तरुणाई गर्दी करते.पण 'पूर्वीच पुण आता राहिलं नाही'च्या धर्तीवर त्या पफ ना आमच्या रविवार सकाळच्या ‘पॅटीस’ ची चव नाही.
खरा पुणेकर अजूनही मराठी पदार्थांच्याकरता जीव टाकतो,खास मराठमोळे पदार्थ शोधत शहरभर फिरत असतो,एखादे विशेष ठिकाण सापडले तर लगेच त्या ठिकाणावरून ‘फेसबुक स्टेटस अपडेट’,whatsapp वर मेसेज फिरायला लागतात.फारच चांगले ठिकाण असेल तर त्याकरता माफक कौतुकाचे एखादे ट्वीट केले जाते.त्या ठिकाणाचा वास लागलेले प्रामाणिक खवैय्या तातडीने आपल्या गाडी काढून तिथे हजेरी लावतो.त्या पदार्थांचा आस्वाद घेतो आणि बाहेर नव्याने होत असलेल्या गर्दीकडे क:पदार्थ असावा अश्या पुणेरी दृष्टीने बघत समाधानानी बाहेर पडतो.गाडीला किल्ली लावून घराकडे निघतो.
मनात मात्र पुढच्यावेळी कुठल्या हॉटेलमध्ये जावे ह्याचा विचार नकळतपणे सुरु झालेला असतो.
©अंबर कर्वे,पुणे
२१.१२.२०१५
क्रमशः
तसा पेरूगेट भावेस्कूल समोर अजूनही असलेल्या ‘लक्ष्मी विश्रांती गृह’मध्ये बटाटे वडा सुरेख मिळायचा.सणसणीत आकारचा कायम गरम मिळणारा वडा,त्याबरोबर भरपूर मिरची आणि लसूण घालून ताजी केलेली भुकटी सारखी चटणी.१९९० पर्यंत हा आत्ताच्या भाषेत ‘जंबो वडा’ एक वडा केवळ १ रुपयात मिळायचा.पुढे पेरूगेट चौकात असलेलं मानकर ह्याचं आताचे ‘गोपी नॉनव्हेज’ तेव्हा ‘प्युअर व्हेज’ होतं.तिथे मिळणार्या वडासँपल,आणि मिसळीकरता आसपासची कॉलेजची आणि नोकरदार दुनिया एकवटायची.रेट माफक असल्याने विशेषतःपेरूगेट भावेस्कूलचे आणि ज्युनिअर कॉलेजचे कुमार लेक्चर ‘बंक मारून’ इकडेच सापडायचे.नंतर समोर अमृततुल्य मधला चहा हमखास.
स.प.समोरचं ‘उदयविहार’ स.प.एवढेच धो धो चालायचे(नंतरनंतर त्याच्या बेसमेंट मध्ये कॅरम खेळणाऱ्या “खेळींच्या” रांगा जास्ती लागायच्या) त्याच्या शेजारीच असलेल्या छोटेखानी ‘लवाटे snacks चा त्यावेळेच्या सदाशिव पेठेत ब्रेडआम्लेट आवडणार्यांना आधार होता.नाहीतर स.प.पोस्टाच्या बाहेर बोळात,ठराविक दिवशी, विशिष्ट पदार्थ मिळणारी टपरी(नाव पुन्हा विसरलो) त्याच्याकडे पायनापल शिरा,मिसळ,सगळेच पदार्थ खास.
आताच्या ग्राहक पेठेच्या जागेत पूर्वी असलेले ‘जीवन’तोपर्यंत काळाच्या पडद्याआड गेलं होतं.आणि टिळक स्मारकच्या अगदी चौकात असलेलं ‘मुक्ता’ कॉलेजियन्स मध्ये फार कमी काळात‘ हिट’ झालं होतं.टि.स्मा.चौकात असलेल्या बादशाही (पूना रिफ्रेशमेंट ) मधले उपवासाची कचोरी,कोथिंबीरवडी सारखे खास महाराष्ट्रीय पदार्थ खायला बाहेगावातून नोकरी निमित्त आलेले नोकरदार लोक आवर्जून यायचे(अजूनही जातात) आताच्या एस.पी.ज बिर्याणी च्या जागी त्याच नावानी व्हेज हॉटेल सुरुवातीला काही वर्ष होतं. तिथे वरती असलेल्या family रूम मध्ये ग्रुपमधल्या पोरींना नेवून पार्टी देणे म्हणजे स.प मधल्या मुलांना एकदम प्रेस्टीज असायचं.
रमणबाग चौकात अगदी ५-६ वर्षापूर्वीपर्यंत सुरु असलेलं ‘किस्मत’ हे पण जळजळीत मिसळीकरता तिखट खाणाऱ्या जमातीमध्ये मापदंड म्हणून प्रसिद्ध होतं.पलीकडे केसरी वाड्याच्या समोरच असलेलं ‘प्रभा’ तेव्हा त्यांच्याकडे मिळणार्या पातळ रस्सा,ब्रेड ,चटणी आतच घालून केलेल्या बटाटा वड्याकरता,आणि उपासाच्या कचोरी करता एकदम पुरातन काळापासून फेमस.आता तेवढी कचोरी बनवणं त्यांनी बंद केलं. बाकी चव अगदी तशीच.प्रभाच्या समोरच महिला बचत गटाने चालवलेले ‘सुगरण’ म्हणजे नाश्त्याच्या पदार्थांपासून ते पोळीभाजीपर्यंत सगळे पदार्थ पुरवणारं हमखास ठिकाण.तिथून थोडसंच पुढे रमणबाग चौकाकडे जाताना छोटेखानी ‘अरविंद कोल्ड्रिंक हाउस’ तिखट रस्सापाव ह्याकरता दर्दी खवय्ये मंडळीत फेमस होतं.नूमवी शाळेच्या शेजारी संतोष भुवन मध्ये
शनिवार पेठेत अहिल्यादेवी हायस्कूल समोरच्या ‘रामदास’मध्ये रस्सा आणि स्लाईस खायला शनिवार पेठेतल्या सगळ्या शाळेत मुलांना सोडायला येणाऱ्या तमाम रिक्षावाल्या काकांची नेहमीच गर्दी असायची.
कुमठेकर रस्त्यावरचं ‘स्वीटहोम’ म्हणजे सहकुटुंब जाण्याचे प्रमुख ठिकाण होतं.’स्वीटहोम’मधल्या साबुदाणा खिचडीवर भरपूर कोथिंबीरीची पेरणी असायची.तिथली इडली विशेषतः सांबार आणि त्याच्यावर बारीक शेव घालून, म्हणजे तर अगदी इडलीची खास पुणेरी चव. तिथेही सगळे नाश्त्याचे पदार्थ उत्तम मिळायचे.कुमठेकर रस्त्यावर जोंधळे चौकातल उडपीच्या आण्णाचे ‘गणेश’ तेव्हा बहुतेक नुकतच सुरु झालं होतं.त्याच्याकडे मात्र टिपिकल उडपी चवीचे इडली सांबार त्यावरती मुबलक खोबरं घातलेली ओली चटणी घालून मिळायचं.नाहीतर झटपट मिळणारा डोसा,उत्तप्पा खावून नोकरदार पटकन आपली दुचाकी बाजूला लावून खावून घ्यायचे.पण त्याच्या पेक्षा जास्ती गर्दी पलीकडच्या ‘प्रभाकर बेकरी’ मधले पट्टी सामोसे घ्यायला व्हायची.लोकं हे सामोसे घ्यायला त्यावेळी रांगा लावून थांबायचे.कुमठेकर रस्त्यावरच ट्रेनिंग कॉलेजच्या थोडं पुढे काही वर्ष ‘पेशवाई’ नावाचे हॉटेल काही वर्षे होतं,ते पण झकास चालायचं.
जिमखान्यावर राहणारे लोक डेक्कनवर अप्पाकडे सोमवार ,गुरुवार ,शनिवार काकडी ,खिचडीकरता गर्दी करायचे (आणि इतर वारी त्याच्याकडच्या बटाटेवड्याकरता)आणि गावात राहणारे खवैये लक्ष्मी रस्त्यावरच्या जनसेवा मध्ये.सोमवार ,गुरुवार,शनिवार,चतुर्थी आणि मोठ्या एकादश्या सोडून पुण्यात कोणी साबुदाणा खिचडी खात नाही असा त्यावेळी पुण्यातल्या हॉटेलवाल्यांचा सार्वत्रिक समज होता.
तुळशीबाग म्हणजे समस्त महिलावर्गाचे लाडके ठिकाण,पण ज्युनियर कॉलेजच्या दिवसात आमच्यासारख्या खादाडांसाठी तुळशीबागेची बाजीराव रस्त्याची सुरवात म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र पासून लक्ष्मी रस्त्याच्या तोंडाशी असणार्या काकाकुवा मँन्शन पर्यंत खाण्याची रेलचेल असायची.सकाळी घरगुती चवीची साबुदाणा खिचडी,उपीट,पोहे,बटाटे वडे हमखास मिळायचे ठिकाण म्हणजे हा परिसर.काकाकुवा मँन्शनच्या आत गेल्यावर समोरच एक छोटेसं हॉटेल होतं(नाव आता आठवत नाही)पण नाश्त्याचे सगळेच पदार्थ दुपारपर्यंत छान मिळायचे.
पण त्याहीपेक्षा दरवाज्याच्या बाहेर एक काका बरेच वर्ष सकाळी ७ च्या सुमारास सायकलवरून घरून डबे भरून शिरा,पोहे,उपीट,साबुदाण्याची खिचडी (खिचडीचे वार तेच तत्कालीन पुण्यातले.. सोमवार,गुरुवार,शनिवार)असे घेऊन यायचे.सकाळी लवकर ऑफिसला जाणारे नोकरदार,रस्त्यावर साफसफाई करणारे कामगार इथपासून मंडई परिसरात ‘रूमवर’राहणारे असंख्य कॉलेजकुमार असे सगळेजण ते येण्याची चातकासारखी वाट बघत असायचे.ते दिसले कि त्यांच्या सायकलभोवती गराडा पडायचा.पेपरप्लेट मध्ये एकेक वाटी भरून फटाफट सगळ्या गर्दीची क्षुधाशांती व्हायची.मग हळूहळू अश्या डबे भरून नाश्त्याची सोय करणाऱ्यांची त्या परिसरात गर्दी व्हायला लागली.आणि ते लोण मग सगळ्या पुण्यातच पोचले.आता शहरातल्या सगळ्या प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळात असे नाश्ता घेऊन उभे असलेले डबेवाले दिसतात.
त्याच्यावरून अजून एक आठवण झाली.त्याकाळी आजच्यासारखे नाश्त्याचे स्वस्तात मिळणारे पदार्थ रात्री उशिरा मिळायचे नाहीत.विशेषतः कॉलेज मधल्या परीक्षेकरता ‘नाईट मारणाऱ्या’ विशेषतः होस्टेलमध्ये रहाणार्या मुलांना जर रात्री उशिरा,पहाटे जर भूक लागली(आणि ति हटकून लागायचीच)तर सरसकट स्वारगेट ,शिवाजीनगर एस.टी.Stand वर जाण्याचा प्रघात होता.खिशात उरलेल्या कमी पैशात खाण्याची त्याच्यापेक्षा आद्य ठिकाणे म्हणजे ‘मंडईमधले ‘मार्केट उपहार गृह’ आणि रात्रभर व्यवसाय करायचं ‘लायसन’ असलेलं लक्ष्मी रस्त्यावरचे गोखले हॉलच्या समोरचे ‘अंबादास धाकू निकम’ ह्यांचे “अंबादास”.रात्री साधारण दीड-अडीच च्या सुमारास ह्या ठिकाणी जरा ‘एक्ष्ट्रा’ तर्र्री मारून खाल्लेल्या ‘जाळ’ मिसळ किंवा ‘सॅंपलपाव’ खाण्यातली अविस्मरणीय ‘गोडी’ फक्त “अभ्यासाकरता(किंवा त्यापेक्षाही अभ्यासाच्या नावाखाली) जागरण केलेल्या “त्यावेळेच्या पोरांनाच” समजेल.पैकी ‘मार्केट उपहार गृहात खाण्याच्या व्यतिरिक्त माणसांचे जे अपरात्री दिसू शकतात ते सारे ‘रंग’ दिसू शकायचे.तिथे पलीकडच्या अनोळखी माणसाशी त्याच्या आधी सुरु असलेल्या चर्चेत बिनदिक्कतपणे भाग घेण्याचा खास पुणेरी अधिकार फक्त एखादा चहाचा कप घेऊन मिळायचा.कधी गिर्हाईकांची चर्चा चांगली सुरु आहे असे दिसले तर दुकानात कॅशला बसलेले शेठ उत्सुकतेने स्वतः येवून त्यात तेवढ्याच पुणेरी अधिकारवाणीने उतरायचे.रात्री नाटक,गाण्याचे प्रयोग संपवून बरेच कलाकार,बडी नेते मंडळी आवर्जून ‘मार्केट’चा कानोसा घ्यायला आवर्जून हजेरी लावायची.
आणि ह्याउलट चित्र ‘अंबादास’ मध्ये.या,काही शिल्लक असले तर खा ,चहा प्या,पैसे द्या आणि निघा.पण सदाशिव पेठ आणि नारायण पेठेच्या मधोमध राहून, काहीशा अबोल झालेल्या ‘अंबादास धाकू निकम’ ह्यांच्याशी जर एकदा सलगी झाली तर त्या माणसासाठी वडासँपल,मिसळ खास राखून ठेवले जायचे.तर्री स्वतः अंबादासशेठनी येवून वाढली तर समजायचे तुम्ही त्यांच्या अगदीच खास गोटातले.दिवसभर ( १ ते ४ सोडून ) जी गर्दी शेजारच्या ‘उपाध्ये ह्यांचे जनसेवा दुग्धालय’इथे असायची तेवढी कदाचित थोडी जास्तीच रात्री ‘अंबादास’च्या आतबाहेर असायची.ह्याच्यावरून त्यांची महती पुण्यात नवीन असलेल्यांना लक्षात येईल.आता शेजारचे खिचडीसाठी रात्रभर साबुदाणे भिजवत ठेवणारे ‘जनसेवा’पण नाही ,आणि अंबादास धाकू निकम’ ह्यांचे ‘अंबादास’ पण नाही.
फर्ग्युसन,बी.एम.,Modern हॉस्टेल मधली दर्दी चहाबाज मुलं रात्री उशिरा शिवाजीनगर च्या न.ता.वाडी.च्या डेपो शेजारी असलेल्या ‘चाचा’च्या टपरीवर ‘चहा मारायला’चक्कर मारायची.फर्ग्युसन मधल्या मुलांना आसपास वैशाली,रुपाली तर कायमच होतंच.पण गेट समोरचं असलेलं ‘सवेरा’ आणि तुकाराम पादुका चौकाच्या पुढे असलेलं पै ह्यांचे ‘निरंजन’ म्हणजे तर कॉलेजमधल्या मुलांची हक्काची मेस.तिथे एकंदर उडपी पद्धतीचे बाकी पदार्थ पण चांगले मिळायचे.
८० च्या दशकात ८० फुटी झालेल्या शास्त्री रस्त्यावर,लोकमान्यनगर मधलं अभ्यंकरांच ‘अजंठा’ मधे किंचित तिखट चवीचे तर्रीवाले सांबार आणि इडली,मिसळपाव,सामोसे ,वडे,भजी असे माफक ऑप्शन असणारे पण त्याच्यामुळे त्यावेळी लोकमान्य नगर भागात कॉटबेसिस वर राहणाऱ्या कॉलेजमधल्या मुलांचं आणि नोकरदारांच नाश्ता करायचं हमखास ठिकाण होतं.
सिंहगड रोड वरच्या लोकांना हॉटेलमध्ये खायला विठ्ठलवाडी देवळाच्या कमानीच्या शेजारी असलेल्या हॉटेल ‘श्री.विठ्ठल’ मध्ये, नाहीतर थोडं चविष्ट खायचं असेल तर फक्त हिंगण्यातल्या ‘आनंद’चाच आधार होता.तिथल्या पुणेरी दही मिसळीचा आस्वाद घ्यायला मात्र दर्दी लोकं आवर्जून अगदी पुण्यातून यायची. त्यावेळेच्या हडपसर,बाणेर ह्या उपनगरात लहानसहान टपरीवर उकळ्या चहा आणि शेवचिवडा,फराळ करणाऱ्या लोकांसाठी धूळ बसलेल्या काचेच्या बरण्यात भरून ठेवलेले शेंगदाण्याचे लाडू असायचे.लहान मुलांकरता रावळगाव सारखी चॉकलेट भरून ठेवलेली असायची.त्यावेळेच्या काही टपर्या आता ‘परमिट रूम’ झाल्या आहेत.
सामिष खाणार्यांना मंडई मधले ‘दुर्गा’,शिवाजी रस्त्यावरचे ‘आसरा’ नाहीतर चित्रशाळा चौकाच्या जवळचे ‘आशीर्वाद’ इथेच जायला लागायचे(त्याच रस्त्यावर आता जवळपास १५-२० मांसाहारी हॉटेल्स आहेत)नाहीतर एकदम मॉडर्न कॅफेवाल्यांचे ‘बांबू हाउस’.मत्स्याहारी लोकांना बालगंधर्व चौकातले ‘कलकत्ता बोर्डिंग हाऊस नाहीतर डेक्कनवर पूनम हॉटेलच्या शेजारी असलेले ‘गोमंतक’ स्वस्तात मस्त.मासे खायची एकदम घरगुती सोय.
१९९०-९१ नंतर आमचं पुण खरोखरच खूप बदललं.चहूबाजूला विस्तारलं.उपनगरं तर कधी शहरात आली ते समजलंच नाही.त्याच्या बरोबर पुण्याने सामावून घेतली नव्याने आलेली लाखो माणसं.त्यांच्या खाद्यसंस्कृती.
त्याकाळी फक्त किर्लोस्करांच्या ‘ब्ल्यू डायमंड’मध्ये किंवा ‘कॅम्प’मधल्या मोजक्या ठिकाणी मिळणारे कॉंटीनेन्टल पदार्थ पुण्यात बहुदा फक्त प्रभात रस्त्याच्या सुरुवातीला असणार्या ‘दर्शन’मध्येच मिळायचे.अगदी स्टार हॉटेलच्या दर्जाचे,अजूनही मिळतात.पण आता जगातल्या प्रत्येक पद्धतीच्या खाण्याचे पदार्थ पुण्यात मिळतात,आणि पुणेकर ते खाण्याकरता आवर्जून त्या ‘थीम हॉटेल्सना’ भेटी देत असतात.चांगले असतील तर(च) त्यांचे कौतुक करतात.
चायनीज पदार्थांना आपल्याकडच्या हॉटेल्समध्ये कधीच मेनूकार्डवर पंजाबी पदार्थांच्या बरोबर मानाचे पान मिळालंय,पण त्याबरोबरच इटालिअन ,जपानीज,थाई,मन्गोलिअन,मेक्सिकन सगळ्या पद्धतीच्या हॉटेल्सची पुण्यात रेलचेल झाल्ये.
पण अस्सल खवैय्या पुणेकर मालवणी पद्धतीचे जेवण,कोल्हापुरी तांबडा,पांढरा रस्सा,बीडच्या पद्धतीची बिर्याणी, लोणी धपाटे हे सगळेच पदार्थ चवीने खातो.नागपुरी सावजी मटणापासून ,जळगावच्या भरीत भाकरी पर्यंत पुणेकरांना कुठलाही पदार्थ वर्ज्य नाहीये. दावणगिरी डोसा, नीर डोसा,इडीअप्पम,कोरी रोटी ते मॅकसिकन नॅकॊज,टॅकोजपर्यंत सगळ्याच पद्धतीच्या खाण्यावर तो तेवढ्याच प्रेमाने तुटून पडतो.खाण्यामध्ये पुणेकरांना कुठलीही जिल्ह्याची,राज्याची,देशाची हद्द पसंत नाही.
पूर्वी लक्ष्मी रस्त्यावरच्या हिंदुस्तान बेकरीचे,शनिपाराच्या शेजारच्या ग्रीनचे, आपटे रस्त्यावरच्या संतोष बेकरीचे ,जोगेश्वरीच्या समोरच्या बोळातल्या पुना बेकरीचे ‘पॅटीस’घ्यायला रविवारी गर्दी व्हायची.आता पॅटीस ऐवजी नव्याने उघडलेल्या अनेक 'कन्फेक्शनरीज' मध्ये ‘व्हेज पफ’ खायला आजची तरुणाई गर्दी करते.पण 'पूर्वीच पुण आता राहिलं नाही'च्या धर्तीवर त्या पफ ना आमच्या रविवार सकाळच्या ‘पॅटीस’ ची चव नाही.
खरा पुणेकर अजूनही मराठी पदार्थांच्याकरता जीव टाकतो,खास मराठमोळे पदार्थ शोधत शहरभर फिरत असतो,एखादे विशेष ठिकाण सापडले तर लगेच त्या ठिकाणावरून ‘फेसबुक स्टेटस अपडेट’,whatsapp वर मेसेज फिरायला लागतात.फारच चांगले ठिकाण असेल तर त्याकरता माफक कौतुकाचे एखादे ट्वीट केले जाते.त्या ठिकाणाचा वास लागलेले प्रामाणिक खवैय्या तातडीने आपल्या गाडी काढून तिथे हजेरी लावतो.त्या पदार्थांचा आस्वाद घेतो आणि बाहेर नव्याने होत असलेल्या गर्दीकडे क:पदार्थ असावा अश्या पुणेरी दृष्टीने बघत समाधानानी बाहेर पडतो.गाडीला किल्ली लावून घराकडे निघतो.
मनात मात्र पुढच्यावेळी कुठल्या हॉटेलमध्ये जावे ह्याचा विचार नकळतपणे सुरु झालेला असतो.
©अंबर कर्वे,पुणे
२१.१२.२०१५
No comments:
Post a Comment